Tuesday, 24 March 2020

आरोग्यम् सुखसंपदा भाग - २

               मागच्या लेखामध्ये आपण बघितलं की आरोग्य चांगले असेल, रोगप्रतिकारक शक्ती चांगली असेल तर कोणत्याही रोगावर सहज मात करता येते. ज्यांनी पहिला भाग वाचला नाही त्यांच्यासाठी पहिल्या भागाची लिंक ह्या लेखाच्या शेवटी दिलेली आहे. आरोग्य चांगले राखण्यासाठी आणि रोगप्रतिकारक शक्ती उत्तम राखण्यासाठी काय काय खबरदारी घ्यायला हवी त्याबद्दल आपण डॉ. अनिरुद्ध धैर्यधर जोशींनी केलेलं मार्गदर्शन पाहिलं. त्यातील काही गोष्टी आपण मगच्या लेखात पहिल्या आता पुढील गोष्टी पाहुयात...

६. कढीपत्ता:-
               जेवण बनवताना फोडणीला सगळ्यात आधी कढीपत्ता घातला जातो आणि जेवताना सगळ्यात आधी ताटाबाहेर असतो. आमटी, डाळ, सांबार यांतील जी कढीपत्त्याची पानं आम्ही बाजूला काढून टाकतो त्या कढीपत्त्याचं विज्ञानाने सांगितलेलं महात्म्य जाणून घेणे महत्वाचे आहे. ह्या कढीपत्त्याची रोज पाच ते सहा पानं कच्ची किंवा जेवणातून चावून चावून खाल्ली असता एक वर्षामध्ये त्या मनुष्याच्या शरीरामध्ये अशा प्रकारचे रसायन उत्पन्न होते की ज्याच्यामध्ये कॅन्सरच्या पेशी जन्मल्या जमल्याच त्यांना हतबल करण्याची शक्ती असते. कॅन्सरच्या पेशी प्रत्येकाच्या शरीरात ह्या ना त्या कारणाने बनतच असतात. कढीपत्त्याची पाच ते सहा पानं रोज चावून खाल्ल्याने कॅन्सरला प्रतिबंध होतो, हे सायंटिफिक जर्नल्स सांगतात. ब्रेस्ट कॅन्सर आणि ब्लड कॅन्सर ह्यांच्याबाबतीत परिणामकारकता पन्नास टक्के आहे तर इतर सर्व कॅन्सरच्या बाबतीत ती ऐंशी टक्के आहे. ऐंशी टक्के! एक साधी गोष्ट आम्हांला किती प्रोटेक्शन देऊ शकते. आपण कढीपत्त्याची पानं खायची आहेतच पण लहान मुलांनाही सवय झाली पाहिजे. लहान मुलं खात नसतील तर चटणी बनवून किंवा इतर कोणत्याही पदार्थातून ती पोटत गेली पाहिजेत. पण जास्त फायदा हा चावून खाण्यानेच आहे.

७. शताक्षी प्रसादम् :-
               शताक्षी म्हणजे महिषासुरमर्दिनी चा पाचवा अवतार... सकाळी नाश्ता झाल्यानंतर शताक्षी प्रसादम प्रत्येकाने भक्षण करायचा. हळद, मध, एक चतुर्थांश लसूण पाकळी ठेचलेली, आणि सुंठ ह्यांचा एक छोटासा लाडू, आयुर्वेदिक गोळ्या असतात त्या साईजचा तयार करून गिळून टाकायचा. ह्यातील हळद, मध, लसूण पाकळी, सुंठ ही मनावर आणि प्राणावर कार्य करणारी आहेत. ही द्रव्ये फिजिकल म्हणजेच शरीरावर  तर काम करणारच आहेत पण मनावर,  बुद्धीवर आणि प्राणांवरही काम करणारी आहेत. त्यांच्यामध्ये काही चुकत असेल तर ते नीट करण्याचं कामही हा शताक्षी प्रसादम करणारच. ही एवढीशी छोटी गोळी आम्हांला वाटते पण ही अतिशय आक्रमक आहे आणि जिथे जिथे म्हणून कमजोरी आहे ती दूर करण्याची ताकद ह्या ठिकाणी आहे. शारीरिक, मनोमय आणि प्राणमय देहातील सर्व प्रकारची दुर्बलता दूर करण्याची ताकद ह्या शताक्षी प्रसादम् मध्ये आहे.
               मनुष्याच्या स्वार्थी व बेफिकीर वृत्तीमुळे त्याने प्राचीन काळीसुद्धा आजच्याप्रमाणेच निसर्गावर अनन्वित अत्याचार व अन्यात केलेले आहेत व त्यामुळे निसर्गाचा कोप होऊन अनके वर्षे पर्जन्यवृष्टी थांबली होती. त्यावेळेस ब्रह्मर्षींच्या व अनेक पवित्र ऋषींच्या प्रार्थनेस प्रतिसाद देऊन आदिमाता महिषासुरमर्दिनी 'शताक्षी' अवतार धारण करून प्रकटली होती. त्या काळात शताक्षीनेच अगस्त्य ऋषिंना दिलेला प्रसाद म्हणजे "शताक्षीप्रसादम्". ह्याच्या नित्य सेवनाने मनुष्याचा बिघडलेला निसर्ग दुरुस्त होत राहतो- शरीराचा, प्राणांचा व मनुष्यबुद्धीचा आणि सत्वगुणाची वृद्धी होऊ लागते.

८. मैदानी खेळ:-
               मुलं हल्ली खेळत नाहीत. हल्ली एका घरात एकच मुलं असत. संपूर्ण बिल्डिंग मध्ये दोनच मुलं. खेळणार कोणासोबत..? ट्युशनलाही जायचं असत. संपूर्ण दिवस अभ्यास करणे हा मुलांवर अत्याचार आहे. अभ्यास योग्य प्रमाणात व खेळणं पण योग्य प्रमाणात पाहिजे. खेळाने तुम्हाला जो पोसिटीव्हनेस येतो, तो खिलाडूवृत्ती, कॉन्फिडन्स येतो आणि एक वेगळीच काम करण्याची धमक येते. स्त्री-पुरुषांनी सुद्धा खेळावे. चाळिशीतही खेळावे, पन्नाशीतही खेळावे, साठीतही खेळावे, खेळत राहिलात पन्नाशीला तर साठीलाही बघाल. आम्हांला फक्त क्रिकेट, फुटबॉल, कबड्डी इतकेच मैदानी खेळ माहीत आहेत पण इतरही अनेक मैदानी खेळ आहेत जे पन्नाशी, साठीची माणसेही व्यवस्थित खेळू शकतील. मैदानी खेळांमुळे प्रसंगावधानता तर वाढतेच पण रोगप्रतिकारक शक्तीही वाढते. शरीराची हालचाल होते आणि व्यायामही होतो. सध्या कोरोनामुळे संचारबंदी आहे त्यामुळे कोणी लगेच खेळण्यासाठी बाहेर पडू नका. परिस्थिती नॉर्मल झाल्यावर मात्र आठवड्यात एक दिवस तरी जितके जण जमतील त्यांनी वेगवेगळे खेळ खेळायला हवेत.








९. अध्यात्मिक उपासना:-
               दररोज कमीत कमी एकदा आन्हिक करणे, गुरुक्षेत्रम् मंत्राचा जमेल तेवढा जास्तीत जास्त जप रोज करणे. श्रीमदपुरुषार्थ ग्रंथराजचर कमीत कमी एक पान तरी रोज वाचणे. दररोज रात्री सवय लावायची- लहान मुलांबरोबर मोठ्यांनीही ३ वेळा हनुमानचालीसा म्हणावी. एवढं जरी केलंत ना, तरी खूप चांगलं आहे. जे तुम्हांला म्हणता येईल ते जरूर म्हणा. पण ह्या 'बेसिक' गोष्टी मात्र कधीही सोडू नका.
               डॉ. जोशी नेहमी सांगतात, दिवसाच्या २४ तासांमधील कमीत कमी २४ मिनिटे तरी आम्हांला उपासनेसाठी राखून ठेवता आली पाहिजेत. येणारा काळ खडतर आहे. आमच्या प्रत्येक प्रयत्नांना उपासनेची जोड असेल तर अनेक गोष्ट सहज सोप्या होतात. डॉ. जोशींनी सांघिक उपासनेचे महत्वही वारंवार अधोरेखित केलेलं आहे. सध्याच्या काळात जरी सांघिक उपासना शक्य नसली तरीही प्रत्येकजण परिस्थिती नॉर्मल होइल तेव्हा एकत्र येऊन उपासना करूच शकतो. आजच्याही परिस्थितीत टेक्नॉलॉजीचा वापर करून घरबसल्या सांघिक उपासना करता येते. त्याच उत्तम उदाहरण म्हणजे समीर दत्तोपाध्ये ह्यांच फेसबुक पेज आणि अनिरुद्ध टीव्ही. ह्या दोन्ही माध्यमांतून रोज सायंकाळी 8 वाजता उपासना प्रसारित होते. ज्यांना शक्य असेल त्यांनी नक्कीच सहभागी व्हावे. दोन्हीचे लिंक लेखाच्या शेवटी देत आहे.


               २०१० सालच्या रामराज्य २०२५ ह्या प्रवचनाव्यतिरक्त डॉ. अनिरुद्ध जोशींनी २०१४ साली "आपले आरोग्य" ह्या विषयावर अगदी सविस्तर व्याख्यान दिले होते. त्यात त्यांनी आरोग्याचे आणि आहाराचे अनेक पैलू उलगडू सांगितले होते. त्याची संपूर्ण माहिती Healthonics ह्या स्वतंत्र वेबसाईटवर आहेत. त्या वेबसाईटची लिंक, ज्यांना रामराज्य २०२५ ही संकल्पना समजून घ्यायची आहे त्यांच्यासाठी आंजनेय पब्लिकेशनची लिंक लेखाच्या शेवटी दिलेली आहे. पण मित्रांनो जाता जाता इतकंच सांगेल. कोरोनाचं संकट फार मोठं आहे. आजच पंतप्रधान मोदींनी २१ दिवसांच्या संपुर्ण लॉकडाऊनची घोषणा केली आहे आणि उद्या हिंदू नववर्षाची सुरवात आहे, गुढीपाडवा आहे. त्यानिमित्त आपण सर्व एक संकल्प करूयात. केंद्र सरकार आणि राज्य सरकार जे सांगेल ते आढेवेढे न घेता ऐकणे हेच सोयीस्कर आहे. पण जोपर्यंत घरात आहोत तोपर्यंत आरोग्याची काळजी घेऊया. जलउपचार पद्धती, कढीपत्ता खाऊ, अध्यात्मिक उपासना करू जे जमेल ते स्तोत्र म्हणू. काळ कठीण आहे. पण डॉ. जोशी म्हणतात त्याप्रमाणे काळजी करू नका, काळजी घ्या. काळजी करायला "तो एकटा" समर्थ आहे.

सौजन्य:
डॉ. अनिरुद्ध धैर्यधर जोशी (MD. Medicine)
रामराज्य २०२५

लिंक:
आरोग्यम सुखसंपदा भाग - १
रामराज्य २०२५ (मराठी)
रामराज्य २०२५ (हिंदी)
RamRajya 2025 (English)
Healthonics
Samirsinh Dhattopadhye FB page
Aniruddha.tv

No comments:

Post a Comment

डुम्स डे किंवा अंतिम निर्णयाचा दिवस

Repost Original Date: 02 मार्च 2021            ख्रिश्चन, ज्यू आणि इस्लाम हे तिन्ही अब्राम्हीक धर्म मानले जातात आणि ह्या तिन्ही धर्मांच्या उग...