Thursday, 9 July 2020

गेल्या एक-दीड वर्षांचा घटनाक्रम...

साल 2019:-

१. हाँगकाँग मधील एक जोडपं तैवानमध्ये सुट्टीसाठी जातं. तैवानमध्ये त्या जोडप्यातील पुरुषाने स्त्रीची हत्या केली. चीनने त्या पुरुषाला चीनच्या हवाली करण्याची ताकीद तैवानला दिली. पण ती व्यक्ती हाँगकाँगची असल्यामुळे तैवानने नकार दिला.

२. ह्या घटनेमुळे चीनने असा कायदा बनवला की जरी हाँगकाँग मध्ये कोणता गुन्हा झाला तर त्याचा खटला चीनमध्ये चालवता येऊ शकतो आणि त्या व्यक्तीला चिनच्या मेनलँड मध्ये हलवता येऊ शकते. ह्या कायद्यामुळे हाँगकाँग मध्ये आंदोलन सुरू झाले.

३. एका हत्येच्या प्रकरणामुळे संधीसाधू चीनने तैवानवर इतका दबाव निर्माण केला की आता कोणत्याही क्षणी चीन तैवान हल्ला करेल.

४.जशी शक्यता निर्माण झाली, तसे तैवानच्या राष्ट्राध्यक्षा त्साई-इंग-वेन तडक अमेरिकेला पोहोचल्या.

५. ह्या भेटीनंतर हाँगकाँग मधील आंदोलन अधिक चिघळले. आंदोलनात अमेरिकेने हस्तक्षेप करायला सुरुवात केली. चीननेही उघडपणे तसे आरोप करायला सुरुवात केली. ह्या एका भडकलेल्या आंदोलनामुळे चीनचा तैवानवरील हल्ल्याचा प्लॅन फसला...

साल २०२०:-

१. साल 2020 उजाडायच्या आधीच चीनमध्ये कोरोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणात झाला होता. खरंतर हा विषाणू चीनला हाँगकाँग मधील आंदोलन चिरडण्यासाठी वापरायचा होता. पण त्याचा थेट आरोप आपल्यावर होऊ नये म्हणून आधी स्वतःच्याच भूमीत तो पसरवला. (चिनी राज्यकर्त्यांना स्वतःच्या जनतेशी काहीच देणंघेणं नाहीये.) मग तिथून हा आजार जगभर पसरला.

२. जगभरात हा आजार एका स्तरापर्यंत पोहोचण्याची चिनी राज्यकर्ते वाट पाहत होते. त्यांना हव्या त्या स्तरापर्यंत हा आजार पोहोचताच विशेषतः अमेरिका बेजार झाल्यावर चीनने पुन्हा कुरबुरी करायला सुरवात केली. साऊथ चायना सी मध्ये युद्धसराव, नौदल तैनातीला सुरुवात झाली.

३. साऊथ चायना सी मधील अमेरिकेच्या नाविक तळावर, युद्धनौकांवर पध्दतशीरपणे कोरोनाचा फैलाव केला गेला. अमेरिकेवर युद्धनौका पुन्हा माघारी बोलवायची वेळ आली.

४. अमेरिकेच्या युद्धनौका माघारी जाताच चिनी राज्यकर्ते तैवान ताब्यात घेण्याची भाषा करू लागले. त्यादिशेने तयारीही सुरू झाली. अमेरिकी युद्धनौका आणि नौदल तळ साऊथ चायना सी मध्ये नसल्यामुळे खूप मोठा धोका निर्माण झाला. तैवानच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला. मोठाच पेच निर्माण झाला होता.

५. हा पेच सोडवायला मदत झाली ती पाकिस्तानच्या मूर्खपणामुळे... अवेळी पाकिस्तानी नेतृत्वाला POK मध्ये निवडणुका घेण्याची उपरती सुचली. (सुचली की सुचवली गेली हाही मोठा प्रश्न आहे.?)

६. भारताने ह्या संधीचा फायदा घेऊन POK खाली करण्याची धमकी पाकिस्तानला दिली. इतकेच नाही तर POK ताब्यात घेण्याची जय्यत तयारी केली. ह्या गोष्टींमुळे पाकिस्तानपेक्षा चीनच जास्त बिथरला.

७. चीनच्या महत्वाकांक्षी OBOR (वन बेल्ट वन रोड) ह्या व्यापारी प्रकल्पाचा भाग असलेला CPEC (चायना-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर) हा प्रकल्प POK मधून जातो. ज्यात चीनने अब्जावधी रुपये ओतले आहेत. CPEC शिवाय OBOR हा प्रकल्प कधीही पूर्ण होऊ शकत नाही. उलटपक्षी चिनच्या सगळ्या महत्वाकांक्षी व्यापारी आणि सामरिक योजना फसतील. मोदी-ट्रम्प जोडीने चीनच्या वर्मावर घाव घातलाय...

८. भारताने POK वर आक्रमण करू नये म्हणून लदाखमधील LAC वर सैन्य तैनाती वाढवली आणि घुसखोरी तसेच LAC नजीक बांधकामाचे उद्योग सुरू केले. आणि इथेच चीन फसला...

९. चीनची सगळ्यात मोठी कमजोरी म्हणजे चीन एकाचवेळी दोन आघाड्यांवर लढू शकत नाही.एकीकडे तैवान ताब्यात घेण्याचे मनसुबे असताना चीनला भारतीय सीमेवर अडकवण्याचे प्रयत्न यशस्वी ठरले.

१०. साधारणतः दोन महिन्यांच्या ताणावानंतर चीनने आगळीक केली. १५ जूनच्या रात्री गस्त घालणाऱ्या सैन्यपथकावर हल्ला केला. त्यात भारताचे 20 जवान शहीद झाले आणि चीनचे 100 हुन अधिक जवान मारले गेले. चीनच्या सैन्य धकाचा फुगा फुटला...

११. ह्या दोन महिन्यांच्या काळात अर्ध लक्ष साऊथ चायना सी मध्ये आणि अर्ध लक्ष भारतासोबतच्या सीमेवर. चीन पूर्णपणे बुचकळ्यात पडला. मोठा निर्णय चीनला घेता आला नाही. तोपर्यंत तिकडून अमेरिकेने यूएसएस रोनाल्ड रेगन ही विमानवाहू युद्धनौका आणि तिचा नाविक ताफा साऊथ चायना सी मध्ये तैवानच्या मदतीला पाठवला. (आजच्या घडीला युएसएस रोनाल्ड रेगन ही अमेरिकेची सर्वात संहारक युद्धनौका मानली जाते.)

१२. आता घडलंय असं की भारतीय सीमेवर भारताने वायुसेनेची आणि लष्कराची तैनाती मोठ्या प्रमाणात वाढली आहे. भारतीय वायुदल मोठ्याप्रमाणात पेट्रोलिंग करत आहे. सतर्क आहे. दुसरीकडे साऊथ चायना सी मध्ये अमेरिकेचे नौदल सज्ज आहे. तिथेही अमेरिकेच्या हवाई कसरती चालू आहे. तिसरीकडे ईस्ट चायना सीमध्ये जापनीज सैन्य आणि नौदल हाय अलर्टवर आहे. चौथीकडून म्हणजेच उत्तरेकडून रशियाचा दणका कधीही पडू शकतो. चीनला मदत करू पाहणाऱ्या इराणला इस्रायलने अडकवून ठेवले आहे. चीनची चारही बाजुंनी कोंडी करून ठेवली आहे... एकीकडून हातपाय पासरायचा प्रयत्न केला तर तीन बाजूनी दणके बसतील... ही कोंडी फोडण्यासाठी चीनचं पुढचं पाऊल फार विध्वंसक असू शकत...

               तुम्हांला काय वाटतं, हा सगळा घटनाक्रम, ही व्यूहरचना काही महिन्यांत झाली...??? नाही... आता घडणाऱ्या घटना कमीत कमी गेल्या सहा वर्षांच्या व्यूहरचनेचा, योजनांचा, कटांचा परिपाक आहे. हे सगळं एका तैवानला वाचवायला सुरू आहे असं वाटतं असेल तर तुम्ही पुन्हा चुकताय. तैवान चीनच्या मूळ लक्ष्याच्या मार्गतला फक्त एक काटा आहे. तैवान ताब्यात आला तर संपूर्ण संपुर्ण साऊथ आणि ईस्ट चायना सीवर चीनचं वर्चस्व निर्माण होईल. अमेरिकेच्या नौदलाचा धोका चीनला उरणार नाही. आणि चीनला संपूर्ण ताकद भारतीय सीमेवर वापरता येईल. सध्याच्या काळात भारताच्या काही गुप्तस्थानांवरील काही अत्यंत महत्वाच्या गोष्टींवर जगभरातील अनेकांचा डोळा आहे. आता त्या महत्वाच्या गोष्टी चीनला हव्या आहेत की चीनच्या मुखवट्याआड इतर कोणाला..?? हा मोठा रंजक प्रश्न आहे...
               सुमारे अडीच लाख वर्षांपूर्वी चिनी राज्यकर्त्यांनी दिवाणी बेटावर (तैवान) हल्ला करून ताब्यात घेतले होते. कारण त्यांना माहीत होते की सामरिक आणि "आध्यात्मिक" दृष्ट्या महत्वाच्या असणाऱ्या ह्या बेटाचा ताबा घेतल्याशिवाय भारतावर पूर्वेकडून हल्ला करता येणार नाही आणि जर केलाच तर तो यशस्वी होणार नाही. त्याकाळी तैवान ताब्यात घेऊन सुद्धा चीन राज्यकर्त्यांच्या आडून कटकारस्थानं करणाऱ्यांचे मनसुबे यशस्वी झाले नाहीत. आणि आताही होणार नाहीत. भारत देशाचं खरं सामर्थ्य त्याकाळीही संपूर्ण जगाने पाहिलं आणि येत्या पाच वर्षांच्या काळात पुन्हा पाहिलं...



-सुमित शिर्के.
(कृपया कोणीही हा लेख कॉपी पेस्ट करू नये, ही विनंती… शेअर करायचा असल्यास ब्लॉग ची लिंक जरूर शेअर करावी.)

डुम्स डे किंवा अंतिम निर्णयाचा दिवस

Repost Original Date: 02 मार्च 2021            ख्रिश्चन, ज्यू आणि इस्लाम हे तिन्ही अब्राम्हीक धर्म मानले जातात आणि ह्या तिन्ही धर्मांच्या उग...