Sunday, 22 March 2020

बरं झालं देवांनी मैदान सोडले...


               एका प्रतिष्ठित वृत्तपत्राचे प्रतिष्ठित संपादक अग्रलेखात लिहितात "देवांनी मैदान सोडले" जगभरात "कोविद-१९" ह्या आजाराने त्यावरून हे महाशय वाट्टेल ते लिहित आहेत. अनेक प्रश्न उपस्थित करत आहेत. काय तर म्हणे "भक्तांचा ओघ आहे म्हणून मंदिरातील दगडी मूर्तींना देवत्व प्राप्त होते. भक्तांचा ओघच थांबला तर कसला देव आणि देवत्व.? एक विषाणू देवांवर भारी पडला" वगैरे वगैरे... जास्त ओढावेढे न घेता ह्या महाशयांना विचारू इच्छितो.. जर भक्तांमुळे देवाला देवत्व प्राप्त होत असेल तर मग तुम्ही अयोध्येला का गेला होता...??? प्रभू रामचंद्रांनी स्वप्नात येऊन तुम्हांला विनवणी केली होती का मला देवत्व द्यायला या...??? स्वतःच्या सोयीसाठी देवांना आणि देवस्थानांना वापरता नंतर त्यांच्याच अस्तित्वावर आणि प्रभावावर प्रश्न उपस्थित करता...?
               शिवशंभुंच्या मोठ्या मोठ्या बाता मारता आणि त्याच शिवशंभुंची शिकवण सोयीस्करपणे विसरता. जिजाऊ आईसाहेब, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज ह्यांची श्रद्धा आणि विश्वास मोठ्यातला मोठ्या संकटात ढळली नाही. तो अफजलखान महाराष्ट्रावर चालून आला होता तेव्हा त्याचीही मानसिकता अशीच होती. बघूया तुमचे देव तुम्हांला वाचवतात का.? तुमचे देव पळाले.? आज तीच मानसिकता तुमच्यात दिसते.
               देवस्थानांना आर्थिक महत्व कोणामुळे आलं...?? माणसांमुळे चा... देवाला वाहिलेल्या दक्षिणेतील एक रुपया तरी देव घेतो का...??? आज जर देवस्थान बंद असतील तर त्यांचं आर्थिक महत्व कमी होईल पण त्याचं अध्यात्मिक महत्व नाही. ह्या देवस्थानांना आर्थिक महत्व प्राप्त होण्याआधी ह्या देवस्थानांना अध्यात्मिक महत्व होतंच की... एकही भक्त गेला नाही तरी त्या देवस्थानांच अध्यात्मिक महत्व कमी होणार नाही... माणसाचं, समाजाचं कर्मस्वातंत्र्य त्या माणसाचं आणि समाजाचं जीवन ठरवत... निसर्गाचा ऱ्हास केला तेव्हा देवाला विचारून केला का..??? प्रयोगशाळेत विषाणू बनवले ते देवाला विचारून बनवले का...??? इतकी युद्ध झाली, त्यात कोट्यवधी माणसं मेली, ती युद्ध देवाला विचारून केली का...???
               देवाला दोष देण्याआधी मानवाने आधी स्वतःच कर्म तपासावे. जे काही चांगलं झालं ते आमच्यामुळे झालं... वाईट झालं तर ते देवामुळे... माझं वाईट होत असताना देव काय करत होता...?? हा मानवी स्वभावगुणच आहे. आज जी परिस्थिती ओढवली आहे ती मानवाने स्वतःच स्वतः वर ओढवून घेतली आहे. आमच्या कर्मस्वातंत्र्यात आणि त्याच्या कर्मफलात तो देव कधीही हस्तक्षेप करत नाही. जे पेराल तेच उगवेल. आणि बरं झालं देवाने मैदान सोडले... मानवजातीला स्वतःची लायकी समजली आणि स्वतःच्या फायद्यासाठी देवस्थानांचा वापर करणाऱ्यांचे खरे चेहरे जगासमोर आले...

© सुमित शिर्के.

No comments:

Post a Comment

डुम्स डे किंवा अंतिम निर्णयाचा दिवस

Repost Original Date: 02 मार्च 2021            ख्रिश्चन, ज्यू आणि इस्लाम हे तिन्ही अब्राम्हीक धर्म मानले जातात आणि ह्या तिन्ही धर्मांच्या उग...